Rohit Gambhir Controversy Photos Viral : रांची येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने अशी आघाडी घेतली. या सामन्यात विराट कोहलीचे दमदार शतक आणि कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला. सामन्यानंतर गंभीर-रोहितयांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे हे नक्की काय प्रकरण आहे? जाणून घेऊया. नेमकं काय आहे प्रकरण? रांचीतील पहिल्या वनडे सामन्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळाच मुद्दा चर्चेत आला. तो म्हणजे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांचा ड्रेसिंग रूममधून व्हायरल होत असलेला फोटो. या फोटोमध्ये दोघेही गंभीर मुद्द्यावर चर्चा करताना दिसत आहेत. त्यामुळे, चाहत्यांमध्ये दोघांमध्ये काही वाद झाला का, अशी चर्चा रंगू लागली. नक्की सत्य काय आहे? केवळ फोटो पाहून कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरू शकते. अशा क्षणचित्रांमधून संपूर्ण संभाषणाचा नेमका संदर्भ समजणे कठीण असते. दोघांच्या चेहऱ्यावर गंभीरता दिसत असली तरी, तो केवळ खेळाच्या रणनितीबद्दल किंवा अन्य महत्त्वाच्या विषयावरील चर्चा असू शकते. त्यामुळे प्रत्यक्षात वाद झाला असे स्पष्टपणे म्हणता येत नाही. हेही वाचा – IND vs SA : रोमांचक सामन्यात भारताने मारली बाजी! शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ रोहित-कोहली आणि गंभीर यांच्यात संबंध बिघडले? दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबतचे संबंध बिघडले आहेत. रोहित-कोहलीच्या भविष्याबद्दलच्या चर्चा, कप्तानीचे मुद्दे आणि सामन्यांच्या रणनीतीबाबतचे मतभेद यांमुळे ड्रेसिंग रूममध्ये तणाव वाढला आहे. या प्रकरणावरून बीसीसीआय चिंतेत आहे. तसेच, सोशल मीडियावर गंभीर यांच्याविरोधात चाहत्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, यामुळे हा तणाव टीमच्या कामगिरीवर परिणाम करण्याची भीती आहे. हेही वाचा – Ayush Mhatre Century : आयुष म्हात्रेचा डबल धमाका! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ठोकले सलग दुसरे शतक या वाढत्या तणावावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय ६ डिसेंबरनंतर एक महत्त्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत रोहित, कोहली आणि गंभीर यांच्या भविष्यावर चर्चा होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अजित आगरकर आणि रोहित यांच्यात जसा संवाद नव्हता, तशीच परिस्थिती गंभीर आणि कोहली यांच्यात असल्याचे बोलले जात आहे. ही बैठक रायपूर किंवा विशाखापट्टणम येथे दुसऱ्या-तिसऱ्या वनडे दरम्यान होण्याची शक्यता आहे. २०२७ च्या वर्ल्ड कपपूर्वी काही मोठे बदल होतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.