वाराणसी – दिवाळीसाठी घरी जात असताना मजूरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पिकअपची पलटी होऊन या अपघातात 4 महिलांचा मृत्यू झाला आहे तर 19 जण जखमी झाले आहे. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा भीषण अपघात आज बुधवार रोजी सकाळच्या सुमारास वाराणसी येथील डाफी परिसरात झाला आहे. हे मजूर दिवाळीसाठी आपल्या घरी बरेली वरून बिहारमधील दाऊद नगर (औरंगाबाद) येथे जात होते.
चालकाला डुलकी लागल्यामुळे पिकअप डिवाईडरला धडकून हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून मदत कार्य सुरु केले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.