बिहारमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी राजद पक्षाचे नेते पंकज यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या, प्रकृती गंभीर

RJD Pankaj Yadav । राजदचे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि जेष्ठ नेते पंकज यादव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आहे. आज सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंकज यादव यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्या आहे. ते मॉर्निंग वॉकला निघाले असताना गुंडानी येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढला. ही घटना साफीसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत आरजेडीने सरकारवर हल्लाबोल केला
आता पक्षाने आरजेडी नेत्यावर गोळीबाराच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. राजदचे प्रवक्ते एजाज अहमद म्हणाले, ‘हा कसला कारभार? कसले सुशासन? विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. आता उत्तर प्रदेश आणि बिहारच्या परिस्थितीत फारसा फरक नाही. बिहारमध्ये गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची चलती आहे. सरकारची सत्ता संपल्याचे स्पष्ट दिसत आहे. बिहारमध्ये गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचा बोजवारा उडाला आहे, प्रशासन गडबडले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सरकारच्या आत बसलेले लोक मलई खाण्यात व्यस्त आहेत.’ असं म्हणत इतका केली आहे.
भाजप नेते नीरज कुमार यांनी कारवाईबाबत चर्चा केली
दुसरीकडे, या घटनेबाबत भाजप नेते आणि पक्षाचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, बिहारच्या मुंगेरमध्ये जे घडले ते दुःखद आहे पण योगींच्या भीतीमुळे उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांची अवस्था कोणापासून लपून राहिलेली नाही. गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जात आहे. बिहारमध्येही एनडीए सरकारच्या काळात गुन्हेगारी खटले चालत नाहीत. तेजस्वी यादव आपल्या कार्यकर्त्यांना आणि परिसरातील लोकांना मागे टाकून परदेशात बॅचलर पार्टी करत आहे. एनडीए सरकारच कारवाई करेल.
हे वाचाल का ?





