श्रीनगर: प्रशासनाने लागू केलेले विविध प्रकारचे निर्बंध जम्मू मधून उठवण्यात आले असून काश्मीर खोऱ्यात मात्र ते आणखी काही दिवस लागू राहणार आहेत असे राज्याचे अतिरीक्त पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत माहिती देताना त्यांनी म्हटले आहे की काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यातील काही जखमींवर उपचार सुरू आहेत.
अन्य ठिकाणच्या घटनांबाबत मात्र त्यांनी माहिती दिली नाही. काश्मीर खोऱ्यातील स्थिती सामान्य आहे कींवा कसे याविषयीही त्यांनी काही भाष्य केलेले नाही. तथापी जम्मूतील स्थिती पुर्ण सुरळीत असल्याने तेथील निर्बंध पुर्णपणे उठवण्यात आले आहेत असे ते म्हणाले. काश्मीरातील निर्बंध मात्र कधी उठवले जाणार या विषयी त्यांनी काही वाच्यता केली नाही.