Resolution on military conflict। जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानला त्यांच्या कृत्यांसाठी योग्य उत्तर दिले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जगभरात ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करून दहशतवादात पाकिस्तानची भूमिका उघड करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असे असताना या ऑपरेशनबाबत पश्चिम बंगाल सरकार विधानसभेत जो प्रस्ताव मांडणार आहे, त्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ हे शब्द नमूद केले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने यासाठी ममता सरकारवर हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगाल सरकार विधानसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ वर प्रस्ताव मांडण्याची तयारी करत आहे, मात्र, त्यासाठी तयार केलेल्या मसुद्यातून ‘ऑपरेशन सिंदूर’ हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांचे कौतुक करणारा ठराव सभागृहाचे अध्यक्ष मांडतील, असे प्रस्तावात म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित प्रस्तावाचे नाव बदलले Resolution on military conflict। बंगाल विधानसभेच्या समितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावाला ‘दहशतवाद्यांशी लढण्यात सशस्त्र दलांचे यश’ असे नाव देण्यात येईल. पण यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ चा उल्लेख नसेल. या सरकारच्या निर्णयावर, भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. “२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २६ जणांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी” आणि “भारतीय सशस्त्र दलांच्या विविध शाखांच्या समन्वित प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी” हा ठराव सभागृहात मांडला जाईल. पश्चिम बंगाल विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहे आणि उद्या मंगळवारी २ तासांच्या चर्चेसाठी हा प्रस्ताव मांडला जाईल. हा सशस्त्र दलांचा अपमान – भाजप Resolution on military conflict। पश्चिम बंगालमधील भाजप विधिमंडळ पक्षाच्या एका सदस्याने म्हटले आहे की, “भारतीय सशस्त्र दल हे देशाचे गौरव आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांविरुद्ध चालवलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. परंतु येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ हा शब्द गायब होणे हे या सशस्त्र दलांचा अपमान आहे.” या मुद्द्यावर, राज्य विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष म्हणाले की, सभागृहात ठराव तयार करण्याची जबाबदारी असलेल्या लोकांना भारतीय सशस्त्र दलांबद्दल आणि सुरक्षा दल वेगवेगळ्या कारवायांना कोणत्या आधारावर नावे देतात याबद्दल मूलभूत माहितीही नाही.