मुंबई : मुंबईतीत कांदीवली (पश्चिम) भागात रहिवासी चाळ कोसळून ढिगाऱ्याखाली 5-6 नागरिक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एनडीआरएफची एक टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.
कांदीवली (पश्चिम) येथील दलजी पाडा येथील सबरिया मशिदीच्या मागील एक चाळ कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना स्थानिकांनी बाहेर काढलं आहे. मात्र, 5-6 रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सचिन नलावडे यांच्यासह इतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून सर्च ऑपरेशन सुरू आहे