महाराष्ट्र राज्य आयटक ग्रामपंचायत महासंघाची मागणी
शुक्रवारी करणार काम बंद आंदोलन
नगर (प्रतिनिधी) –ग्रामपंचायत कर्मचारी यांची वेतन कपात करणारा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आयटक ग्रामपंचायत महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा शुक्रवारी (दि.28) रोजी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शासनमान्य वेतन 100 टक्के शासनानेच अदा करणे आवश्यक आहे. या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 10 जुलै रोजी महाराष्ट्रव्यापी आंदोलन केले. आता पुन्हा याच मागणीसाठी 28 ऑगस्ट रोजी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य आयटक ग्रामपंचायत महासंघाच्यावतीने राज्य अध्यक्ष कॉ.तानाजी ठोंबरे, राज्य सचिव कॉ.नामदेवराव चव्हाण, राज्य सचिव ऍड.सुधीर टोकेकर, जिल्हाध्यक्ष ऍड.कॉ.सुभाष लांडे यांनी जाहीर केले आहे.
28 एप्रिल च्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायतींची वसूली आणि उत्पन्नाची अट बंधनकारक केल्यामुळे त्याचप्रमाणे लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध अद्याप चालू असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसूलीच्या प्रमाणातच 50 टक्के आणि 75 टक्के वेतन मिळणार आहे. म्हणजे 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने किमान वेतनाचे दर पुनर्निधारित करुन ते परिमंडळ 3 मधील कर्मचाऱ्यांना 11,625 आणि परिमंडल 2 मधील कर्मचाऱ्यांना 13,085 रु मान्य केले असले तरी वरील शासन निर्णयामुळे त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.
त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन सुनिल शिंदे, मारुती सावंत, कृष्णकांत आंदोरे, बलभिम काळापहाड, शैलेंद्र गायकवाड, अनिल शिंदे, महादेव शेळके, राहुल पोळ, गणेश शिंदे, संजय शेलार किरण शिंदे, शरद खोडदे, बेलकर, भांडलकर, संतोष लहासे, बाळासाहेब खेडकर, संतोष आल्हाट, गोरख शिर्के, संजय डमाळ, सुरेश कोकाटे, उत्तम कटारे, शिवाजी दगाबाज, बाळासाहेब लोखंडे, गणेश रोहोकले, यशराज शिंदे, शब्बीर महंमद शेख, शैलेश गायकवाड, शाहूराव खंडागळे, बाळासाहेब आल्हाट, अशोक काळे, ताजुद्दीन गफूर शेख, लोकेश मोरे, भाऊसाहेब त्रिभुवन, धोंडीराम पवार यांनी केले आहे.