नगर -करोना च्या उपचाराकरिता शासनाने निश्चित केलेले दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी विश्व मानव अधिकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात आल्याची माहिती विश्व मानव अधिकार अल्पसंख्याक विभागचे प्रदेशाध्यक्ष नवेद रशीद शेख यांनी दिली.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. सध्या काही ठिकाणी करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जागा उपलब्ध नाही. सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांकडून अधिक पैसे आकारले जात आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात आहे. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे.
हॉस्पिटलचे येणारे लाखोचे बीलाने नागरिक चिंतेत आहे. सर्वसामान्य नागरिक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊच शकत नाही. खाजगी रुग्णालयात उपाचार घेता यावा यादृष्टीने करोना च्या उपचाराकरिता शासनाने निश्चित केलेले दर कमी करावे, तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजना सर्व खाजगी रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याची मागणी विश्व मानव अधिकार परिषदेच्या वतीने करण्यात आली.