‘यूपीएससी ऐवजी आरएसएसच्या माध्यमातून भरती होत आहे, आरक्षण हिरावले जात आहे’ राहुल गांधींचा मोदी सरकारवर आरोप

Rahul Gandhi । काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. यूपीएससीने नुकत्याच केलेल्या भरतीचा संदर्भ देत ते म्हणाले की, ‘हे सरकार केंद्रीय लोकसेवा आयोगा ऐवजी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’मार्फत मोठ्या पदांसाठी भरती करत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगा ऐवजी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या माध्यमातून लोकसेवकांची भरती करून नरेंद्र मोदी संविधानावर हल्ला करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातील महत्त्वाच्या पदांवर लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करून एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांचे आरक्षण खुलेआम हिसकावले जात आहे.
Rahul Gandhi । उच्च पदांवर वंचितांना प्रतिनिधित्व नाही
आपल्या जुन्या विचारांची आठवण करून देताना राहुल गांधी म्हणाले,“मी नेहमी म्हणत आलो आहे की, सर्वोच्च नोकरशाहीसह देशातील सर्व उच्च पदांवर वंचितांचे प्रतिनिधित्व केले जात नाही, त्यात सुधारणा करण्याऐवजी त्यांना पार्श्विक प्रवेशाद्वारे उच्च पदांवरून काढून टाकले जात आहे.”
Rahul Gandhi । ‘यामुळे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला धक्का बसतो’
मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की,’यूपीएससीची तयारी करणाऱ्या हुशार तरुणांच्या हक्कांवर हा दरोडा असून, वंचितांसाठी आरक्षणासह सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला मोठा धक्का आहे. काही कॉर्पोरेट्सचे प्रतिनिधी महत्त्वाच्या सरकारी पदांवर विराजमान होऊन काय शोषण करतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सेबी, जिथे खाजगी क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीला प्रथमच अध्यक्ष केले गेले.’





