RCB head coach Andy Flower has been fined 15% of his match fee : आयपीएल २०२६ मधील ५४ व्या सामन्यात रविवारी रात्री रॉयस चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सचा पराभव करत प्लेऑफच्या दिशेने कूच केली असली, तरी या विजयाला शिस्तीच्या कारवाईचे गालबोट लागले आहे. सामन्यादरम्यान पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यावर आयपीएल प्रशासनाने कारवाई केली असून त्यांच्यावर मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? हा संपूर्ण प्रकार आरसीबीच्या डावातील १७.२ व्या षटकात घडला. मुंबईचा गोलंदाज अल्लाह गझनफरच्या चेंडूवर फलंदाज क्रुणाल पंड्याने एक शॉट मारला. सीमारेषेवर नमन धीर आणि तिलक वर्मा यांनी तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिलकने तो झेल पूर्ण केला नाही आणि चेंडू सीमापार गेल्याचा (षटकार) इशारा केला. 🚨 ANDY FLOWER HAS BEEN FINED 15% OF HIS MATCH FEES. 🚨 – Flower spoke aggressively to the 4th umpire during the 18th over. pic.twitter.com/DX9o8bWg3y — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 11, 2026 मात्र, रिप्लेमध्ये नमन धीरचा पाय बाउंड्री कुशनला लागला नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, क्रुणालला पायात गोळे (Cramps) आल्याने त्याने धाव घेतली नाही आणि तो चेंडू ‘डॉट बॉल’ ठरला. या निर्णयावर अँडी फ्लॉवर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चौथ्या पंचांशी (Fourth Umpire) वाद घातला. फ्लॉवरने मान्य केली चूक – 🚨 RCB Coach Fined! 🚨 Andy Flower hit with a 15% match fee fine after the #MIvsRCB clash in Raipur. Level 1 Breach: “Audible obscenity” • Heated row with 4th umpire over a controversial catch. • Tension peaked in the 17.2 over! Fair call or too harsh? 👇 #Ipl2026 pic.twitter.com/lZN2Yb8tL5 — Cricket Virtus (@cricketvirtus) May 11, 2026 आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, फ्लॉवर यांनी कलम २.३ चे उल्लंघन केले आहे, जे मैदानावर अपशब्दांचा वापर करण्याशी संबंधित आहे. अँडी फ्लॉवर यांनी त्यांची चूक मान्य केली असून मॅच रेफरी अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. आयपीएलच्या नियमानुसार ‘लेव्हल १’ च्या उल्लंघनासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो. हेही वाचा – RCB vs MI : थरारक सामन्यात मुंबईचा ‘गेम ओव्हर’! शेवटच्या चेंडूवर आरसीबीने मारली बाजी; क्रृणाल-भुवनेश्वर ठरले ‘गेमचेंजर’ शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला थरार – या वादाव्यतिरिक्त हा सामना अत्यंत रोमांचक झाला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत १६६ धावा केल्या होत्या. १६७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आरसीबीची दमछाक झाली, मात्र शेवटच्या चेंडूवर आवश्यक धावा काढून आरसीबीने हा सामना खिशात टाकला. या विजयामुळे मुंबईचे या हंगामातील आव्हान आता संपुष्टात आले आहे.