नवी दिल्ली – येत्या 30 तारखे पासुन विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार असुन भारतीय संघ इंग्लंडला रवाना होण्यापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बोलताना रवी शास्त्री म्हणाले की भारताच्या खेळाडूंना या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो. विंडीज किंवा बांग्लादेश हे संघ 2015 ला जसे होते, त्यापेक्षा आता फारच वेगळे आणि सुधारित दिसत आहेत. अशा वेळी महेंद्रसिंग धोनी याची संघातील भूमिका महत्वाची असणार आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनी अत्यंत अनुभवी आहे. महत्वाच्या सामन्यांना कलाटणी देण्याचे काम अनेकदा त्याने केले आहे. धोनी यंदाच्या विश्वचषकात महत्वाचा खेळाडू ठरेल, असेही शास्त्री म्हणाले.
तसेच यावेळी रवी शास्री यांनी विश्वचषकाचे अतिरिक्त दडपण नसल्याचे म्हटले. जर आम्ही आमच्या ताकदीवर खेळलो तर आम्ही विश्वचषक जिंकू शकतो. ही खूप कठीण स्पर्धा आहे. मात्र, लीग स्टेजमध्ये 9 सामने खेळल्याने टीमला लय मिळवण्याची चांगली संधी मिळेल.