Accident News : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख-पांगरी परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्न समारंभ आटपून घरी परतत असताना दुचाकीचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. (Accident News) मृतांमध्ये हातखंबा येथील सुमित विलास कांबळे (वय ३५) आणि विकास काशीराम कांबळे (वय ३८) यांचा समावेश आहे. या दोघांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (Accident News) कुटुंबांचा आधार हिरावला सुमित कांबळे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात तीन लहान मुली असून कुटुंबाचा एकमेव आधारच हरपला आहे. तर विकास कांबळे हे वाहनचालक म्हणून नोकरी करत होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावरही मोठा आघात झाला आहे. (Accident News) अपघात नेमका कसा झाला? रविवारी सायंकाळी देवरुख-पांगरी येथील धोकादायक वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. तिघेही तरुण लग्नसमारंभ आटपून परतत होते. अपघात इतका भीषण होता की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Accident News) अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि नाणीज येथील संस्थेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हातखंबा आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Accident News)