Ramdas Athawale । लोकसभा निवडणुकीतील राज्यातील जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटताना दिसून येत नाही. कारण महायुतीतील सर्वच पक्ष आगामी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून प्रत्येकांच्या जागेवरच दावा समोर येतोय. त्यातच मित्रपक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाने देखील राज्यातील दोन जागांची मागणी केलीय. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी मला शिर्डीतून उमेदवारी देण्यात येणार होती पण…Ramdas Athawale ।
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ,’ मला यंदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस तयार होते. किंबहुना ते माझ्या उमेदवारीसाठी आग्रही होते. फडणवीसांनी त्यादृष्टीने प्रयत्नही केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण आल्याने फडणवीसांचा निर्णय बदलला गेल्याची माहिती त्यांनी दिलीय. त्यांच्या या वक्तव्याने महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी शिर्डीच्या जागेविषयी गौप्यस्फोट केला. गेल्या काही दिवसांनी रामदास आठवले (रामदास आठवले) शिर्डी आणि सोलापूर लोकांची जागा आमच्या पक्षाला द्यावी, अशी मागणी करत आहेत. परंतु, महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जागावाटपावरून मतभेद आहे. त्यामुळे त्यांची मागणी मान्य करण्यात आली म्हटलं जातंय.
माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर विचार Ramdas Athawale ।
मला शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. 2009 साली लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डीतून माझा पराभव झाला होता. यंदा आरपीआय पक्षाला लोकसभेची किमान एक जागा मिळावी, असा आमचा आग्रह होता. मात्र, तसे होऊ शकले नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिले आहे की, 2026 मध्ये माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर रिपाईबाबत विचार केला जाईल. केंद्रात रिपाईला कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठीही देवेंद्र फडणवीस प्रयत्न करणार आहेत,”असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा
“…नाहीतर आम्हाला तोंड दाखवणं अवघड होऊन जाईल” ; असं का म्हणाले रामदास आठवले ? वाचा