Uddhav Thackeray – अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. ती त्रिवार मान्य नाही, उलट आता प्रभू श्रीरामांना भाजपमुक्त करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ते आज नाशिकमध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
शिवसेना मला वडिलोपार्जीत मिळाली. वारशाने मिळाली. आम्ही प्रयत्न केला म्हणून आज भाजप सत्तेत आहे, असा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी केला. ठाकरे पुढे म्हणाले की, मोदी पंतप्रधान व्हावे, म्हणून आम्ही देखील प्रचार केला होता. त्या वेळी आम्ही घोटाळेबाज नव्हतो का? आता करोना काळातील घोटाळे काढले जात आहेत.
मात्र, तेवढेच नाही तर सर्व मनपातील घोटाळे बाहेर काढा. पीएम केअर फंडातील घोटाळा देखील समोर आणण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. रुग्णवाहिका खरेदीत झालेल्या घोटाळ्याबाबत तुम्ही का बोलत नाहीत? असा आरोपही ठाकरेंनी यावेळी केला. ७५ वर्षांत काँग्रेसने काय केले? असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आता दहा वर्षांत काय केले? याचे उत्तर देण्याची ही वेळ आली आहे.
राम की बात झाली, आता काम की बात करो, असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले. आमच्यावर काँग्रेससोबत गेल्याचा आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्यावर हिंदूत्त्व सोडण्याचा आरोप आज करत आहे. ३० वर्ष भाजपसोबत राहिल्याने आम्ही निर्लज्ज भाजपवाले झालो नाही, तर काँग्रेससोबत राहुल काँग्रेसवाले काय होणार? असा सवालही त्यांनी केला.
अजिबात सत्य नाही –
शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीची माती मी अयोध्येला सोबत घेतली होती त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. काल कोणीतरी पंतप्रधानांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. मात्र, हे अजितबात सत्य नाही. त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज अयोध्येत श्रीराम मंदिर बनले नसते, असा दावा देखील ठाकरेंनी यावेळी केला.
वचन मोडणारे रामभक्त कसे?
श्रीराम कोणत्या एका पक्षाचे असूच शकत नाही. ते करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आपल्याला ते मुक्त करावे लागणार आहे. म्हणजे भाजपमुक्त श्रीराम आपल्याला करावा लागणार आहे. प्रभुराम हे एकवचनी होते. मात्र, शिवसेनेला वचन दिलेले मोडणारे रामभक्त कसे असू शकता? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
बालीचा वध करावा लागणार
सध्या सर्व राममय झाले आहे. मात्र, शिवसेना संपवणाऱ्यांचा वध करावा लागणार असल्याचे आवाहन देखील ठाकरे यांनी केले. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना बालीशी केली आहे.