अली अब्बास जफर यांची नवीन वेबसिरीज “तांडव’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 15 जानेवारीला या वेबसिरीजचा पहिला एपिसोड रिलीज झाला. मात्र, पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता जीशान आयुब एका हास्य नाट्यद्वारे काही कॉमेंट करताना दिसतो. त्यावर प्रेक्षकांनी काही आक्षेप घेतले आहेत. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आक्षेप असल्याने आता “तांडव’बाबत नवीन वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर एक अभियान सुरू झाले आहे.
तांडव वेब सिरीज मालिके मध्ये झालेल्या हिंदु देव देवतांच्या विटंबनेच्या संदर्भात हिंदूच्या दुखावलेल्या भावने विरोधात मी या वेब सिरीज च्या निर्माता, दिगर्दरशक, अभिनेता यांच्या विरोधात FRI दाखल करण्यासाठी घाटकोपर चिरागनगर पोलिस ठाणे येथे 12. 30 जाणार आहेत.
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) January 17, 2021
यावर आता राम कदम यांनी ट्विट करत तांडवचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, ‘अभिनेता जीशान अय्यूबने जाहीरपणे माफी मागावी आणि जोपर्यंत या सीरिजमध्ये योग्य ते बदल करण्यात येत नाही तोपर्यंत ‘तांडव’वर बहिष्कार टाका.’
त्यांनी पुढे लिहिले आहे की,’तांडव वेब सिरीज मालिके मध्ये झालेल्या हिंदु देव देवतांच्या विटंबनेच्या संदर्भात हिंदूच्या दुखावलेल्या भावने विरोधात मी या वेब सिरीज च्या निर्माता, दिगर्दरशक, अभिनेता यांच्या विरोधात FRI दाखल करण्यासाठी घाटकोपर चिरागनगर पोलिस ठाणे येथे 12. 30 जाणार आहेत.’
दरम्यान ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान झाल्याचं म्हणत सोशल मीडियावर #BoycottTandav हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. त्यासोबतच #BoycottBollywood हादेखील हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.
“तांडव’मध्ये डिंपल कपाडिया आणि सैफ अली खान लीड रोलमध्ये आहेत. मात्र, त्यांच्या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी जोरदार लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. काही काळापूर्वी विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून डावी विचारसरणी पसरवण्याच्या काही घटना दिल्ली आणि प्रमुख शहरांमध्ये घडल्या होत्या. त्यातील फोलपणा दाखवण्याचा प्रयत्न “तांडव’मध्ये असेल, पण त्यादरम्यान भगवान शंकरावर टीका होत असल्याचाही आक्षेप आहे.