Rajnath Singh : माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्या पुस्तकावरील वादानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. माजी लष्करप्रमुखांवर पुस्तके लिहिण्याबाबत कोणतीही बंदी घातली जाणार नाही. तसेच निवृत्तीनंतर २० वर्षांपर्यंत लष्करी अधिकाऱ्यांना पुस्तके लिहिण्याची परवानगी दिली जाणार नाही हे वृत्तही पूर्णपणे खोटे असल्याचे म्हणत त्यांनी ते फेटाळून लावले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या पुस्तकाबाबत सरकारला प्रश्न विचारला. यामुळे संसदेत मोठा वाद निर्माण झाला व अधिवेशनाचे कामकाज कठीण झाले होते. २०२० मध्ये चीनसोबतच्या गलवान संघर्ष आणि सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान जनरल एमएम नरवणे (Rajnath Singh) हे देशाचे लष्करप्रमुख होते. Manoj Naravane ऑक्टोबर २०२३ मध्ये जनरल नरवणे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की त्यांनी त्यांचे आत्मचरित्र फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी लिहिले आहे. पीटीआयने या पुस्तकातील काही उतारे देखील प्रकाशित केले. जनरल नरवणे यांनी या पुस्तकात गलवान खोऱ्यातील संघर्षापासून ते चीनसोबतच्या सैन्य मागे घेण्याच्या करारापर्यंत, म्हणजेच सीमा वादाच्या निराकरणापर्यंत सर्व तपशील उघड केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्याशी झालेल्या त्यांच्या फोनवरील संभाषणांचा आणि बैठकांचा इतिहास लिहिला आहे. या पुस्तकात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सीसीएस) आणि चायना स्टडी ग्रुप (सीएसजी) यांच्या बैठकांचाही उल्लेख आहे.