त्यांचे निर्णय योग्य ठरल्याचे “वर्क फ्रॉम होम’मधून स्पष्ट
पुणे – भारताच्या संगणक आणि इंटरनेट प्रसाराचा पाया राजीव गांधी यांनी घातला हे “त्रिवार सत्य’ आहे. देशातील तत्कालीन विरोधी पक्षाचा विरोध झेलत राजीव गांधी यांनी संगणकाचा आग्रह धरल्यामुळेच आज आपण संगणक क्षेत्रात प्रगती करू शकलो आणि हीच संगणकीय आणि इंटरनेट प्रणाली ऑनलाइन व्यवहारासाठी, वर्क फ्रॉम होमसाठी आपल्याला करोना संक्रमण काळात लॉकडाऊन मध्ये तारणहार ठरली. राजीव गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करताना, त्यांचे हे योगदान लक्षात आल्याखेरीज रहात नाही, असे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
कात्रज येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. संगणकाला विरोध करताना ज्यांनी संसदेवर बैलगाडी मोर्चा आणला तेच आज स्वतःला डिजिटल क्रांतीचे प्रणेते म्हणवून घेत आहेत.
शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे, अभिनव शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राजीव जगताप, पीएमपीएमएल कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे आदींनी राजीवजींना अभिवादन केले. कॉंग्रेस प्रवक्ते आणि राजीव गांधी स्मारक समितीचे तिवारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या प्रसंगी सर्वश्री सेवादल प्रदेश सरचिटणीस हरिदास अडसूळ, विश्वास दिघे, शिवाजी भोईटे, भोला वांजळे, संजय अभंग, धनंजय भिलारे, शंकर शिर्के, प्रमोद मारणे, विनायक तामकर, नरसिंह अन्दोली, महेश अंबिके, अशोक काळे, उदय लेले, निलेश साळुंके, गणेश कुरे उपस्थित होते.