राजगुरूनगर – खेड तालुक्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मंगळवार (दि. 15 ) व बुधवारी (दि. 16) या दोन दिवसांच्या कालावधीत “आपले कुंटुब आपली जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत संपुर्ण कुटुंबांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकाई संजय तेली यांनी दिली. दरम्यान, 15 पेक्षा अधिक रुग्ण असतील त्या गावांमध्ये दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
खेड तालुक्यात करोना बाधित व्यक्तींची संख्या पाच हजरापर्यंत पोहचली आहे. मृतांची आकडेवारी वाढत असल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी व बाधित व्यक्ती शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपले कुटुंब आपली जबाबदारी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार येत्या मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात वैद्यकीय, मेडीकल सेवा आणि शासकीय कार्यालये वगळता सर्व खासगी अस्थापनासह, बॅंका, भाजी बाजार आणि सर्व व्यवसाय कडेकडीत बंद राहणार आहेत. या कालावधीत शहरातील सरव कुंटुबातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी 250 पथके नेमण्यात आली आहे.
राजगुरूनगर, चाकण, आळंदी या तीन नगरपरिषदांसह ग्रामीण भागात ज्या गांवात 15 पेक्षा अधिक करोना रुग्ण आहेत. अशा सर्व गावांची घरटी कुंटुब सदस्यांची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी घरी राहुन येणाऱ्या आरोग्य पथकाला सहकार्य करून तपासणी करून माहिती द्यावी, असे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.
शहरातील करोना समुह संसर्गाची साखळी तोडून आपल्या कुंटुबातील संशयितांना वेळेत उपचार मिळणार आहे तरी नागरिकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन सहकार्य करुन दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रकाश पाटील व चाकण आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी केले आहे.
एका पथकाकडून 50 घरातील लोकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. सशंयित नागरीकांची पुन्हा गावातच वैद्यकीय डॉक्टरांमार्फत तपासण्या करून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून उपचार सुरू केले जाणार आहे, अशी माहिती खेड तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून स्वत:चे आणि कुंटुबासह आपल्या परिसरातील जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपले कुंटुब आपलीच जबाबदारी असे समजुन सहकार्य करावे, असं आवाहन दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहेे.