नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयानेही ‘चौकीदार चोर है’ म्हटलंय, या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर बिनशर्त माफी मागितली आहे. यामुळे आता हा वाद शमण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी आतापर्यंत या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त केली होती, माफी मागितली नव्हती. पण त्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त करत राहुल गांधींना फटकारलेही होते. त्यानंतर आज अखेर राहुल गांधी यांनी न्यायालयाची माफी मागितली आहे.
Congress President Rahul Gandhi has filed a three page affidavit stating his unconditional apology to Supreme Court for his remark on Rafale deal, "Supreme Court has accepted that "chowkidaar chor hai" https://t.co/UGBf8PR8D2
— ANI (@ANI) May 8, 2019
काय आहे प्रकरण
राफेल प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर, अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आता कोर्टानेही सांगितलं चौकीदार चोर है, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. यावर भाजपने आक्षेप घेतला होता.