Pune ZP Election – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध गटांसाठी विशेष मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, अर्चना निकम आणि नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने म्हणाले, मनुष्यबळ कक्षाचे नोडल अधिकारी सहाय्यक महसूल अधिकारी प्रमोद भांड, साहीर सय्यद, धम्मदीप सातकर आणि भूमेश मसराम, प्रियांका शिंगाडे, अश्विनी कुलकर्णी, सरस्वती पोंदे, स्मिता बगाटे, मैथिली माने, स्नेहल शेलार, माध्यम कक्षाचे प्रा योगेश हांडगे हे काम पहात आहेत. प्रत्येक गटातील मतदारांना सुलभ, सुरक्षित व समावेशक वातावरणात मतदान करता यावे, हा या विशेष मतदान केंद्रांचा मुख्य उद्देश आहे. विविध प्रकारच्या मतदान केंद्रांचे नियोजन करताना मतदार संख्या आणि आवश्यक सुविधा निश्चित करण्यात आल्या आहेत. विशेष मतदान केंद्रांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. महिला मतदान केंद्र – महिलांना सुरक्षित व आरामदायी वातावरणात मतदान करता यावे यासाठी हे केंद्र केवळ महिलांसाठी ठेवण्यात आले आहे. येथे महिला अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे केंद्र लोणीकाळभोर येथे आहे.युनिक मतदान केंद्र – स्थानिक वैशिष्ट्ये, संस्कृती व ओळख जपण्यासाठी णपर्र्ळिींश मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पुणे या केंद्रामध्ये परिसराची स्थानिक ओळख, सांस्कृतिक बाबी व वैशिष्ट्यपूर्ण मांडणीचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे मतदारांना आपुलकीचा आणि सकारात्मक मतदान अनुभव मिळणार आहे. मतदारांचा सहभाग वाढवणे व मतदानाबाबत उत्साह निर्माण करणे, हा या णपर्र्ळिींश मतदान केंद्राचा मुख्य उद्देश आहे. हे केंद्र उरळीकांचन येथे असणार आहे. झरीवरपरीहळप मतदान केंद्र – पारंपरिक पद्धतीचे पालन करणार्या महिलांसाठी गोपनीय व सुरक्षित वातावरणात मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे केंद्र खेडशिवापूर येथे आहे. विशेष मतदान केंद्रांची स्थापना केल्याने अधिकाधिक मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळते, असे डॉ यशवंत माने यांनी सांगितले. विविध घटकांच्या गरजा लक्षात घेऊन मतदान सुविधा उपलब्ध करून देणे हा या विशेष केंद्रांचा मुख्य उद्देश असून, त्यामुळे हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अधिक समावेशक, पारदर्शक आणि यशस्वी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.