Pune News : राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत (Pune News) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांनी ऑनलाइन प्रशिक्षण बंद करून ऑफलाईन प्रशिक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चाने केलेल्या सातत्यपूर्ण मागणीचा आणि संघर्षाचा मोठा विजय मानला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून IBPS, SSC, रेल्वे, MES यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या (Pune News) तयारीसाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रशिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. ग्रामीण भागातील इंटरनेटच्या समस्या, प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा अभाव, शंका निरसनात होणारा विलंब आणि स्पर्धात्मक वातावरणाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर युवा मोर्चाने विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाकडे ठाम भूमिका घेतली. भाजपा युवा मोर्चा, पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदने, बैठका आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याद्वारे हा मुद्दा जोरकसपणे मांडण्यात आला. महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या 23 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत या मागणीची दखल घेऊन ऑनलाइन प्रशिक्षण बंद करण्याचा आणि ऑफलाईन प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष वर्गात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज, शंका निरसन आणि स्पर्धात्मक वातावरणाचा मोठा लाभ मिळणार आहे. Pune News विशेषतः ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार असून, त्यांना दर्जेदार प्रशिक्षणाची समान संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यशाचे प्रमाण वाढण्यास मोठी मदत होणार आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष वैभव सोलनकर,सरचिटणीस स्वप्नील मोडक,अमर बुदगुडे,ओंकार कड्डे,युवती प्रमुख रसिका सणस,उपाध्यक्ष आबासाहेब थोरात,अनिकेत भालेराव,सुयोग सावंत,परमेश्वर तागुंदे,जगदीश कोळेकर,विवेक साळुंखे,संदीप केसकर आदी उपस्थित होते. युवा मोर्चाच्या या यशामुळे (Pune News) राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. “विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या युवा मोर्चाचा हा विजय आहे,” या पुढेही विद्यार्थ्यांसाठी लढणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे साहेब,महाज्योती संचालक मिलिंद नारंगी साहेब यांचे मनःपूर्वक आभार अशी प्रतिक्रिया वैभव सोलणकर यांनी व्यक्त केली आहे.