आळंदी -हिवाळ्याचा हंगाम अर्धा अधिक संपतो ना संपतो तोच सकाळी 11 नंतर उन्हाने माणसाच्या अंगाची लाही लाही होते, त्यामुळे डिसेंबरच्या मध्यंतरीलाच ठिकठिकाणी रसवंतीची चक्रे फिरण्यास सुरुवात झाली आहे. या रसवंती ग्रहांमध्ये तीन प्रकार
आहेत एक इलक्ट्रिक, दोन बैलाचा घाणा व मेहनतीचा घाणा म्हणजेच स्वतः खांद्यावर चररख्याचा दांडा घेऊन फिरवून फिरवून लाकडाच्या दांडक्यातून काढला जाणारा रस यालाच म्हणतात मेहनतीचे फळ.
असेच एक मेहनतीचे फळ अनेकांना देणारे रस्त्यावरील हात गाडीवरून रसवंतीचा व्यवसाय करणारे अशोक बोरुडे देहू-आळंदी रस्त्यावर गेली सात वर्षांपासून रसवंतीगृह चालवून अनेकांचे मन तृप्त करताना दिसत आहे.
या घाण्यावरील रसाची चव काही वेगळीच असते,त्यामुळे ग्राहक देखील याकडे जास्त असल्याचे चित्र दिसत आहे, अशा या मेहनतीने गाळलेल्या रसाला मागणी देखील जास्त प्रमाणात असते.