घोडेगाव – ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचा कणा आहे. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी राजकारणविरहित काम करून गावाचा विकास केला पाहिजे, असे मत शारदा प्रबोधिनीचे हभप पांडुरंग महाराज येवले यांनी व्यक्त केले. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील श्रीसंत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पतसंस्थेने केलेल्या सामाजिक कार्यांचा उल्लेख आणि पतसंस्थेच्या विशेष योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
याबरोबरच नुकत्याच पार पडलेल्या घोडेगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. पतसंस्थेच्या कामकाजाबाबत माहिती देताना शारदा प्रबोधिनीचे हभप पांडुरंग महाराज येवले म्हणाले, घोडेगावातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार व्हावा आणि गावातील आरोग्य, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन यासाठी प्रयत्न करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक पुरुषोत्तम भास्कर होते. यावेळी कै. लासबुवा काळे, सोमनाथ काळे, क्रांती गाढवे, सावता पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर यांचे मनोगत झाली. सखाराम पाटील काळे, पांडुरंग अभंग, देवराम बेल्हवरे, डॉ. केशव काळे, शाम होनराव, सुरेश दिवेकर, तसेच नवनिर्वाचित सरपंच अश्विनी तिटकारे, प्रशांत काळे, राजेश काळे, विजय काळे,
ज्योती घोडेकर, रुपाली झोडगे, रत्ना गाडे, गोविंद घोडेकर ,विनोद काळे, धनंजय काळे, नामदेव भास्कर, सावता झोडगे, मनोज काळे, सुनील इंदोरे, स्वप्निल घोडेकर, कपिल सोमवंशी, प्रदीप घोडेकर, संतोष भास्कर, लक्ष्मण झोडगे, अमोल काळे, रुपाली जंबुकर, दीपाली काळे, जोत्सना डगळे, कविता घोडेकर,ज्योती पानसरे, कांचन काळोखे, विठ्ठल करवंदे, दत्ता वऱ्हाडी आदी उपस्थित होते.