पुणे – भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांची ८ जानेवारी रोजी ८० वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने भारती विद्यापीठाच्या देशभरातील शैक्षणिक संकुलात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
सर्वत्र महारक्तदान शिबिर, सांगली येथे रन दे भारती मॅरेथॉन, नवी मुंबई येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन, पलूस कडेगाव येथे आरोग्य शिबिर, पुणे येथे कला प्रदर्शन, फूड फेस्टिवल, प्रश्नमंजुषासह विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमालेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, लेखक अच्युत गोडबोले, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, लेखक डॉ. दीपक शिकारपूर, वक्ते डॉ. यशवंत पाटणे आणि संजय आवटे यांचे विविध विषयावर व्याख्यान होणार आहे.
स्त्रियांच्या आरोग्यावरती व्याख्यान, बाल गुन्हेगारीवरील व्याख्यान, समाज प्रबोधन रॅली, आरोग्य तपासणी शिबिर, गुन्हेगारी प्रतिबंध व्याख्यान, महिला सुरक्षा व कायदे व्याख्यान, वैज्ञानिक दृष्टिकोन कार्यशाळा, भारुडाचा कार्यक्रम, योग शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पालक आनंद मेळावासह विविध उप्रकम होणार आहेत.