पुणे जिल्हा : तुषार सिंचनात पाणीबचतीचे फवारे

डिंग्रजवाडीत विक्रम गव्हाणे यांची आधुनिक शेती
लक्ष्मण गव्हाणे
कोरेगाव भीमा – महाराष्ट्रात शेतीच्या विविध समस्यांमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असले तरी गेल्या साठ वर्षांत शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर आधुनिकतेची कास धरली आहे. शेती तंत्रज्ञानात किमया दाखवून देणारा तुषार सिंचनाचा प्रयोग शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथील शेतकरी विक्रम रामचंद्र गव्हाणे व त्यांचे चिरंजीव तुषार विक्रम गव्हाणे व अजय विक्रम गव्हाणे या शेतकऱ्यांनी केला आहे.
मागील काही वर्षांत पश्चिम पट्ट्यात ऊस हेच प्रमुख पीक आहे. उसासोबतच कांदा, गहू, बाजरी, पालेभाज्याची शेती करताना देखील शेतकरी दिसतात. गव्हाणे यांनी देखील उसासोबतच ६० गुंठे शेतात कोथिंबीरची लागवड करून पाण्याची बचत करण्यासाठी कायमस्वरूपी थंडावा राहण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर केला आहे. यातून पाण्याची बचत केली आहे.
शेतांसाठी विविध पिके, प्रदेश आणि माती प्रकारांसाठी तुषार सिंचन प्रणाली लवचिक आहे. जे फरो सिंचन सारख्या इतर सिंचन प्रणालींना आव्हान देतात. वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंकलर हेड्स किंवा नोझल बदलून, रिझर्स स्प्रिंकलर बसवलेल्या राइजरची उंची बदलून किंवा पाण्याचा दाब किंवा अगदी पाईपचा आकार समायोजित करून, शेतकरी पिकांना आणि जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी कसे लावले जाते, याचा व्यास आणि परिणाम बदलू शकतात.
खते आणि रसायनांसाठी वापर
शेतकरी त्यांच्या सिंचन प्रणालीमध्ये फर्टीगेशन किंवा केमिगेशन घटक समाविष्ट करून खत घालण्यासाठी किंवा रसायने लागू करण्यासाठी त्यांच्या स्प्रिंकलर सिंचन प्रणालीचा सहज वापर करू शकतात.
उत्पादन वाढीसाठी योगदान
तुषार सिंचन शेतीमध्ये अनेक फायदे देते. पिके, फळबागा, भाजीपाला, रोपवाटिका आणि हरितगृहांना पाणी पोहोचवण्याची ही एक बहुमुखी आणि कार्यक्षम पद्धत आहे. विविध प्रकारच्या स्प्रिंकलर सिंचन प्रणाली उपलब्ध असल्याने, शेतकरी त्यांच्या विशिष्ट गरजांसाठी सर्वात योग्य पर्याय निवडत आहेत. तुषार सिंचनाचा वापर करून, शेतकरी पाणी वाचवू शकतात, वेळ आणि श्रम वाचवू शकतात, एकसमान पीक वाढीस चालना देऊ शकतात, झाडांचे संरक्षण करू शकतात, पोषक वितरण वाढवू शकतात. मातीची धूप कमी करू शकतात. शाश्वत आणि उत्पादन वाढीसाठी योगदान देत आहे.
आजोबापासून आधुनिक शेतीचा वारसा
शेतकरी तुषार विक्रम गव्हाणे म्हणाले की, संपूर्ण शेती ही ओलिताखाली असली तरी ही पाण्याचा अपव्यय टाळावा. शेतीचा कस वाढावा या प्रमुख उद्देशाने तुषार सिंचन करून आम्ही हा प्रयोग केला. आधुनिक शेती करणे हे आत्ताच नव्हे तर आजोबांपासून आम्ही करीत आलो आहोत. बैलाने शेती करण्याच्या काळात आमच्या आजोबांनी ट्रॅक्टर घेऊन आधुनिकतेचा वापर करून प्रगत शेती करण्याचा प्रयत्न केला. आजोबांपाठीमागे वडील विक्रम गव्हाणे व आम्ही त्यांचा वारसा पुढे चालवत आहोत.





