गेली 27 वर्षांपासून अखंड सेवेचा वसा, वारसा जपताहेत
आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 727 वा संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. यासोहळ्यात श्री ज्ञानेश्वर महाराज स्वयंसेवा कार्यकारी मंडळातर्फे विशेष सेवा देण्यात आली. मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे, मंदिरातील स्टॉलवर देणगी जमा करणे, जमा झालेली देणगी मोजणे, लाडू विक्री, दर्शनबारीत पाणी, प्रसाद वाटप करण्यात आले.
सेवेसाठी मंदिर व परिसरात 150 पुरुष व 200 महिला तसेच जालना येथील 53 जणांचा स्वयंसेवक समूहही कार्यरत होता, अशी माहिती स्वकाम मंडळाचे अध्यक्ष सुनिल तापकीर आणि महिला अध्यक्ष आशा सुनिल तापकीर यांनी दिली. या सेवेचे व्यवस्थापन सुनील तापकीर करतात. विशेष म्हणजे आषाढी कार्तिकी वारीसह वर्षभर सेवा केली जाते.
धनाजी गावडे, सुभाष तांगडे, कैलास सरोदे, आकाश सुरुंग, सुभाष बोराटे, अरुण देवकाते, आत्माराम सांडभोर, अनंत दिंडाळ, प्रकाश ठाकूर, भगवान घोलप, किशोर तुरे, संदीप बर्गे, अंकुश बनकर, गोपाळ फुलावरे, संभाजी चौधरी, कृष्णा लोंढे यांसह आदी स्वयंसेवक, स्वयंसेविका यांचा या सेवेत सहभाग आहे.