टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही बारामती – बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. बारामती येथे ते पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे असे कसे म्हणता येईल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करीत हा स्थानिक प्रश्न आहे. याचा अर्थ, ही निवडणूक फक्त स्थानिक पातळीवरची आहे. याकडे राज्याने लक्ष देण्याची गरज नाही. अशी पुस्टी शरद पवार यांनी जोडली. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या दि. २२ जूनला निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. शरद पवार यांच्या पॅनेलचे देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच बारामतीत शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, आजूबाजूला जे तालुके आहेत, त्यांचे लक्ष इथे नाही. बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता. परंतु, आता कापूस इथे राहिला नाही. म्हणजेच पूर्वी बारामती कापसासाठी ओळखली जात होती, असे बारामतीत सूतगिरणी का झाली नाही, यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक नुकतेच महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करताना पवार म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे हित साधले जाईल.नुकतेच सरकारने १० महत्वाचे निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतले. यामध्ये कृषी क्षेत्रातील निर्णयांचा देखील समावेश आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. महाराष्ट्र सरकारने 500 कोटींचा निर्णय घेतला आहे. ऊस आणि बाकीचे पिके वापरण्याचे धोरण फायनल केले. हा फायद्याचे असेल म्हणून निर्णय घेतला.