#video : प्रियांका गांधी यांचे भर बर्फवृष्टीत जबरदस्त भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

Updated On:

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज श्रीनगर येथे समारोप होत आहे. या समारोपासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते आणि इतर विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिले आहेत. राहुल गांधी यांच्या भगिनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी देखील समारोप कार्यक्रमात हजर आहेत. दरम्यान, आज सकाळपासूनच काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. या बर्फवृष्टीतच प्रियांका गांधी यांनी आपले भाषण पूर्ण केले.

श्रीनगरमध्ये आज सकाळपासून बर्फवृष्टी होत आहे त्यामुळे समारोपाच्या कार्यक्रमाला देखील याठिकाणी उशीर झाला. मात्र असे असूनही काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला. आज सकाळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे लहान मुलांप्रमाणे बर्फात खेळताना दिसले. त्याचे व्हिडिओदेखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

समारोपाच्या सभेला संबोधित करताना प्रियांका गांधी  म्हणाल्या, “या देशाच्या संविधानासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात आदर आहे. जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छिते की, त्यांनी खुल्या मनाने भारत जोडो यात्रेचे स्वागत केले. जेव्हा माझा भाऊ काश्मीरकडे येत होता, तेव्हा माझ्या आईला आणि मला त्यांनी मेसेज केला. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये जाताना मी आपल्या घरी जातोय असं वाटतंय. माझ्या घरातील लोक माझी वाट पाहतायत. त्यांची आणि माझी गळाभेट झाल्यानंतर मी घरातल्या लोकांना भेटेल असं वाटतंय”

“संपूर्ण देशाने भारत जोडो यात्रेला पाहिलं आणि समर्थनही दिलं. आज देशात जी राजकीय परिस्थिती आहे, त्यातून देशाचे भले होणार नाही. ही यात्रा एक अध्यात्मिक यात्रा राहिली असे मला वाटतं. सत्य, अहिंसा आणि बंधुतेच्या आधारावर हा देश बनला. ही मूल्य आपण जपली पाहीजेत. भारत जोडो यात्रेने आपल्याला प्रेम आणि एकतेचा रस्ता दाखवला आहे. या बर्फवृष्टीत इथे जमलेल्या प्रत्येकाला मी धन्यवाद देऊ इच्छिते की, तुम्ही सर्वांनी या देशाला एक नवा आशेचा किरण दाखवला आहे. हा आशेचा किरणच देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल.”, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी दिली.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १४५ दिवस, १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरु झालेल्या या यात्रेचा आज समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी देशभरातील २१ समविचारी पक्षांना काँग्रेसने निमंत्रण दिलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

2026-07-08 19:19:53

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Supreme Court : 'बँक संघटना वकिलांना काळ्या यादीत टाकू शकत नाही' - सर्वोच्च न्यायालय

2026-07-07 19:20:10

Supreme Court : 'बँक संघटना वकिलांना काळ्या यादीत टाकू शकत नाही' - सर्वोच्च न्यायालय

Syria blast : सीरियामधील स्फोटांमध्ये १८ जखमी; फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांच्या भेटीदरम्यान झाले स्फोट

2026-07-07 19:04:21

Syria blast : सीरियामधील स्फोटांमध्ये १८ जखमी; फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांच्या भेटीदरम्यान झाले स्फोट

Ratnagiri Landslide : रत्नागिरीत दरड कोसळून ५ घरे गाडली; एकाची सुटका, दोघे अडकले

2026-07-07 18:09:34

Ratnagiri Landslide : रत्नागिरीत दरड कोसळून ५ घरे गाडली; एकाची सुटका, दोघे अडकले

Wayanad Landslide : वायनाला मुसळधार पावसामुळे भूस्खलन; कल्लाडी बोगदा प्रकल्प परिसरात दुर्घटना

2026-07-07 15:56:06

Wayanad Landslide : वायनाला मुसळधार पावसामुळे भूस्खलन; कल्लाडी बोगदा प्रकल्प परिसरात दुर्घटना