PM Modi Mann Ki Baat 118th Episode | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात संबोधित केले. या वर्षातील हा पहिला भाग होता आणि या रेडिओ कार्यक्रमाचा 118 वा भाग होता. ‘मन की बात’ कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो, परंतु मोदींनी आज म्हणजेच 19 जानेवारी रोजी या कार्यक्रमाला संबोधित करण्यामागचे कारणही सांगितले आहे. आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’च्या ११८ व्या भागात बोलताना त्यांनी प्रजासत्ताक दिन आणि महाकुंभबाबतही भाष्य केले आहे. यावेळी मोदी म्हणाले की, “दरवेळी मन की बात महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते, पण यावेळी आपण चौथ्या रविवारी ऐवजी तिसऱ्या रविवारी एक आठवडा आधीच भेटत आहोत, कारण प्रजासत्ताक दिन पुढच्या रविवारी आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. यावेळीचा ‘प्रजासत्ताक दिन’ खूप खास आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा हा ७५ वा वर्धापन दिन आहे. या वर्षी संविधान लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.” भारतीय राज्यघटना समितीमधील सर्व सदस्यांचे विचार हा भारताला मिळालेला एक मोठा वारसा असल्याने मी त्या सर्वांना वंदन करतो. राज्यघटना सभेदरम्यान, अनेक विषयांवर दीर्घ चर्चा झाल्या. त्या चर्चा, संविधान सभेतील सदस्यांचे विचार, त्यांचे शब्द, हाही आपला सर्वात मोठा वारसा आहे, असे मोदी म्हणाले. PM Modi Mann Ki Baat 118th Episode | कुंभमेळा हा जागतिक वारसा प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत कुठेही भेदभाव किंवा जातीयवाद नाही. यामध्ये दक्षिण भारताचे लोक येतात, पूर्व आणि पश्चिम भारताचे लोक येतात. कुंभमेळ्यात, श्रीमंत आणि गरीब सर्व एक होतात. PM Modi Mann Ki Baat 118th Episode | कुंभमेळा प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार येथे साजरा केला जातो, तर दक्षिण भागात पुष्करम गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या काठावर साजरा केला जातो. त्याचप्रमाणे, कुंभकोणमपासून तिरुक्कड-युरपर्यंत, कुडावासलपासून तिरुचेरईपर्यंत, अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्या परंपरा कुंभमेळ्याशी जोडल्या गेल्या आहेत. ‘कुंभ’, ‘पुष्करम’ आणि ‘गंगा सागर मेळा’ हे आपले उत्सव आपल्या सामाजिक संवाद, सौहार्द आणि एकतेला प्रोत्साहन देतात. गेल्या वर्षी अयोध्येत झालेल्या राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठानावर बोलताना मोदी म्हणाले की, प्राण प्रतिष्ठानची ही द्वादशी ही भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या पुनर्स्थापनेची द्वादशी आहे. त्यामुळे पौष शुक्ल द्वादशीचा हा दिवस एक प्रकारे प्रतिष्ठा द्वादशीचा दिवसही बनला आहे. इस्रोचे केले अभिनंदन मोदी म्हणाले, बेंगळुरू येथील भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप पिक्सेलने भारतातील पहिले खासगी उपग्रह नक्षत्र ‘फायरफ्लाय’ यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे. हे उपग्रह नक्षत्र जगातील सर्वात उच्च-रिझोल्यूशन हायपरस्पेक्ट्रल उपग्रह नक्षत्र आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या शास्त्रज्ञांनी उपग्रहांचे अवकाशात डॉकिंग साध्य केले आहे. जेव्हा दोन उपग्रह अवकाशात जोडले जातात तेव्हा या प्रक्रियेला स्पेस डॉकिंग म्हणतात. अंतराळ स्थानकाला आणि अंतराळातील क्रू मोहिमांना पुरवठा पाठविण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. हे यश मिळवणारा भारत हा चौथा देश बनला आहे. हेही वाचा: “…आणि माझा हात रक्तबंबाळ झाला होता”; अक्षय कुमारने सांगितला चाहत्याचा किस्सा