‘लोक तुम्हाला गांभीर्याने तेंव्हा घेतील जेंव्हा …’ ; चिराग पासवान निवडणुकीवरून प्रशांत किशोर यांचे भाष्य

Prashant Kishor on Chirag Paswan। केंद्रीय मंत्री चिराग पासवान २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतात. याबाबत, जन सूरजचे आर्किटेक्ट प्रशांत किशोर यांनी एक मोठे विधान केले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. त्यांनी यावेळी,”चिराग पासवान हे आधीच मंत्रिमंडळात मंत्री आहेत. तुम्ही मंत्रीपद सोडल्यावरच लोक विधानसभा निवडणूक लढवण्याचा मुद्दा गांभीर्याने घेतील. खासदार पदाचा राजीनामा देऊन लढा” असा सल्ला देखील त्यांनी चिराग पासवान यांना दिला असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशांत किशोर माध्यमांच्या काही प्रश्नांची उत्तरं देत होती. त्यावेळी त्यांनी चिराग पासवान यांच्याविषयी भाष्य केले. यावेळी त्यांनी, “ते बिहारच्या राजकारणात सक्रिय होत आहेत, ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की ही चांगली गोष्ट आहे. नवीन तरुण नेते आहेत. लालू, नितीश, सुशील मोदी, रामविलास पासवान यांचे युग संपले. जर चिराग पासवान यांनी दावा केला तर त्यांचे स्वागत आहे. लोकशाही आहे. जनतेला निर्णय घेऊ द्या.’ असे त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे प्रशांत किशोर यांनी, “दिल्ली आणि पाटणा दोन्ही ठिकाणी पाय ठेवून तुम्ही राजकारण करू शकत नाही. वैयक्तिकरित्या, चिराग बिहारमध्ये येऊन येथील राजकारणात सक्रिय भाग घेण्याचे मी स्वागत करतो. ही चांगली गोष्ट आहे.”असेही यावेळी म्हटले.
मुजफ्फरपूर घटनेवरून मुख्यमंत्री नितीशवर हल्लाबोल Prashant Kishor on Chirag Paswan।
दुसरीकडे, मुझफ्फरपूर बलात्कार प्रकरणाबाबत किशोर यांनी, मुख्यमंत्र्यांनी एकही विधान जारी केलेले नाही. निर्भया प्रकरण घडले, संपूर्ण देश हादरला. बिहारमध्ये याहूनही भयानक घटना घडली आहे आणि कोणीही त्याची दखल घेत नाही. पीएमसीएचच्या अधीक्षकांना काढून टाकून हे प्रकरण मिटवण्यात आले.
प्रशांत किशोर यांनी यांनी, “जर तुम्ही सैन्यात भरती झाला असाल आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसाल तर तुम्ही लढू शकाल का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार हे पद भूषविण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या योग्य नाहीत. हे कॅमेऱ्यासमोर सांगत आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र द्या” असे आव्हान देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिले आहे.
‘त्यांनी’ बिहारच्या लोकांवर मानसिक आजारी व्यक्ती लादू नये Prashant Kishor on Chirag Paswan।
तसेच प्रशांत किशोर यांनी यावेळी,”जर आपण कोणावर आरोप केले तर ते म्हणतात की ते आपल्याला न्यायालयात खेचतील, म्हणून जर नितीश कुमारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्याला मानसिकदृष्ट्या निरोगी असल्याचे दाखवण्यासाठी न्यायालयात खेचावे. हे आरोग्यदायी नाहीत. त्यांना एक गंभीर आजार आहे. जो माणूस पंतप्रधानांचे नाव विसरत आहे तो बिहारच्या समस्या सोडवेल असे तुम्हाला वाटते का? भाजपने बिहारच्या १३ कोटी लोकांवर मानसिक आजारी व्यक्ती लादू नये” असे म्हणत त्यांनी नितीशकुमार आणि भाजपवर सडकून टीका केली.





