मुंबई – वंचित बहुजन आघाडीला विरोधकांच्या इंडिया आघाडीत घेतले तरच आम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ असे वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून कळवले आहे.
मणिपूर येथून सुरू झालेल्या यात्रेत सामील होण्याचे आमंत्रण त्यांना दिल्यानंतर आंबेडकरांनी गांधींना लिहिलेल्या पत्रात आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी वारंवार संवाद साधूनही वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रातील इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मी तुमच्या भारत जोडो न्याय यात्रेचे आमंत्रण सशर्त स्वीकारत आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत सामील होण्याचे दीर्घ-प्रतीक्षित आमंत्रण मिळाल्याशिवाय तुमच्या यात्रेत सामील होणे माझ्यासाठी कठीण होईल असे आंबेडकर यांनी या पत्रात लिहिले.
Earlier today, I received an invitation from Shri @RahulGandhi to join him in his Bharat Jodo Nyay Yatra.
I have conditionally accepted the invitation and stressed on the fact that it would be difficult for me to join him in his Yatra as VBA has NOT yet been invited to INDIA… pic.twitter.com/qiYqDo26hs
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 16, 2024
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा २0 किंवा 21 मार्च रोजी मुंबईत समाप्त होईल. प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीने शिवसेनेबरोबर राजकीय आघाडी केली आहे. पण त्यांना अजून इंडिया आघाडीत घेण्यात आलेले नाही.