पुणे- राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्षभरात 12 किरकोळ रजा मिळत होत्या. आता त्या 20 दिवसांच्या केल्या आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी पोलिसांच्या रजा वाढल्या पाहिजेत. यासाठी गृहविभागाच्यावतीने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ मान्यता देवून पोलिसांच्या 12 किरकोळ रजेमध्ये वाढ करून त्या 20 किरकोळ रजा केल्या. तसेच ज्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या दिवशी रजा आहे किंवा आठवडी रजा आहे, अशा कर्मचाऱ्याला अगोदरच्या दिवशी रात्रीच्या कर्तव्यावर बोलवू नये, अशा सूचनाही दिल्या असल्याचे देसाई यांनी सांगितले.