नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मास्टर स्ट्रोक’मुळे देशातील 45 कोटी लोकांनी नोकरीची आशा सोडली आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी एका बातमीचा हवाला देत केला.
राहुल यांनी ज्या बातमीचा हवाला दिला त्यात म्हटलं की, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने अहवाल दिला की 2017 ते 2022 दरम्यान, एकूण कामगार सहभाग दर 46 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर घसरला, सुमारे 2.1 कोटी कामगारांनी काम सोडले आणि फक्त 9 टक्के पात्र लोकांना रोजगार मिळाला.
या अहवालात असेही म्हटले की भारतात सध्या 90 कोटी लोक रोजगारासाठी पात्र आहेत. मात्र त्यापैकी 45 कोटींहून अधिक लोकांनी कामाचा शोध घेणं सोडून दिलं आहे.
राहुल गांधींनी ट्विट करून म्हटलं की, ‘न्यू इंडियाचा नवा नारा: हर-घर बेरोजगारी, घर-घर बेरोजगारी. मोदीजी हे 75 वर्षातील देशाचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांच्या ‘मास्टर स्ट्रोक’मुळे 45 कोटींहून अधिक लोकांना नोकरी मिळण्याची आशा सोडून दिली आहे.