ओडिशा – काँग्रेस पक्षाने गरिबांना गरीब ठेवण्याचं षडयंत्र नेहमी केले, असं षडयंत्र, ज्याचं पाप कधीही धुतलं जाऊ शकत नाही. प्रत्येक निवडणुकीत गरीब जनता मोठ्या आशेने काँग्रेससोबत राहिली, पण सत्तेवर येताच या पक्षाने गरिब जनतेला कायम धोकाच दिला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. ओडिशातील कालाहांडी मध्ये प्रचारसभेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
कांग्रेस जैसे दलों ने गरीब को गरीब रखने की साजिश रची है। ऐसी साजिश जिसका पाप ये कभी नहीं धो पाएंगे।
हर चुनाव में गरीब, उम्मीदों के साथ इनके साथ जुड़ा, लेकिन चुनाव जीतने के बाद इन दलों ने गरीबों के साथ धोखा किया है: पीएम मोदी #BharatBoleModiModi
— BJP (@BJP4India) April 2, 2019
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, मी तुम्हाला आश्वासन देतो की, ओडिशामध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर ओडिशामधील गरिबांच्या स्थितीमध्ये आम्ही सुधारणा करूच. जी कामं 70 वर्षात झाली नाहीत, ती आम्ही पाच वर्षात करू, असं देखील मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही कल्पना करू शकतां देशाचा किती पैसा हा मध्यस्थीकडे जात होता, आणि त्याचं रूपांतर काळ्या पैशात होत होतं. पण हे सारं थाबंविण्याच काम भाजप केंद्र सरकारने केल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.