PM Modi In Rajsthan – राजस्थानात नव्याने स्थापन झालेले भजनलाल सरकार विकासाच्या दिशेने काम करेल. या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आश्वासक आहे. आता राज्य सरकार किमान पाच लाख घरांवर सोलर पॅनल्स बसवणार आहे आणि भविष्यात सर्व ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
राजस्थानमध्ये रेल्वे, रस्ते, वीज आणि इतर विषयांशी संबंधित 17 हजार कोटी रुपयांच्या राजस्थानच्या विविध योजनांचे उद्घाटन मोदी यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. | PM Modi In Rajsthan
पंतप्रधान मोदी म्हणाले की, राज्यात आणि देशातही दहा वर्षांपूर्वी घोटाळे आणि बॉम्बस्फोटांची चर्चा होत होती, मात्र आता विकसित भारताची चर्चा होऊ लागली आहे. वर्ष २०१४ पूर्वी लोक सतत भीतीच्या छायेत होते. दिवस कसे तरी निघून जातील असे लोकांना वाटायचे. पण आज आपण मोठी स्वप्ने पाहतो आहोत. आज देश विकसित भारताबद्दल बोलतो आहोत. ही केवळ शब्द आणि भावना नसून प्रत्येक कुटुंबाचे जीवन समृद्ध करण्याची मोहीम आहे. गरिबी मुळापासून नष्ट करण्याची ही मोहीम आहे. गरीबांसाठी चांगला रोजगार निर्माण करण्याची मोहीम आहे.
भजनलाल सरकारचे कौतुक करताना पीएम मोदी म्हणाले की, राजस्थान सरकारने आपल्या बजेटमध्ये 70 हजार नोकऱ्यांची घोषणा केली आहे, तर आधीच्या सरकारमध्ये फक्त पेपर लीक झाले होते. राज्यातील नवे सरकार सत्तेवर येताच पेपरफुटीच्या नावाखाली तरुणांवर होणाऱ्या अन्यायाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करून केंद्र सरकारने पेपर फुटणाऱ्यांविरोधात कडक कायदा केला आहे. हा कायदा झाल्यानंतर माफिया पेपर लीक करण्यापूर्वी १०० वेळा विचार करतील. | PM Modi In Rajsthan
काॅंग्रेसकडे नाही दूरदृष्टी…
पंतप्रधान म्हणाले की काँग्रेसची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्यांनी दूरदृष्टीने सकारात्मक धोरणे आखली नाहीत. काँग्रेसकडे भविष्यातील विकासाचा रोड मॅप नव्हता. या विचारसरणीमुळे भारताची जगात बदनामी झाली. काँग्रेसच्या काळात करोडो घरात वीज नव्हती. जेव्हा काँग्रेसने काम केले नाही, तेव्हा राजस्थानच्या जनतेने त्यांना धडा शिकवला. पण तरीही काँग्रेसला शहाणपण येत नाही. काँग्रेसचा एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे मोदींना कडाडून विरोध करणे. मोदींच्या विरोधकांना मिठी मारणे हा काँग्रेसचा स्वभाव बनला आहे.