PM Modi। संसदेचे २०२५ चे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी सुरुवातीला आपल्या भाषणात ‘प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेसाठी पाऊस खूप महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळात देशाला त्याचा फायदा होईल. हे पावसाळी अधिवेशन देशासाठी अभिमानास्पद आहे.” असे म्हटले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, “पावसाळा हा नवोपक्रम आणि नवनिर्मितीचे प्रतीक आहे.” असे म्हटले. तसेच आतापर्यंत, देशातील हवामान खूप चांगले प्रगती करत आहे. शेतीसाठी फायदेशीर हवामानाचे वृत्त आहे. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेत, देशाच्या अर्थव्यवस्थेत, ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत पाऊस महत्त्वाचा आहे… यावेळी गेल्या १० वर्षांत ३ पट पाणीसाठा झाला आहे, ज्याचा फायदा येत्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेलाही होईल” असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली PM Modi। ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, २२ मिनिटांतच दहशतवाद्यांच्या मालकांची घरे जमीनदोस्त करण्यात आली. ‘मेड इन इंडिया’ या नवीन प्रकारच्या लष्करी शक्तीकडे जग खूप आकर्षित झाले आहे. आजकाल, जेव्हा जेव्हा मी जगातील लोकांना भेटतो तेव्हा भारतात बनवल्या जाणाऱ्या ‘मेड इन इंडिया’ शस्त्रांबद्दल जगाचे आकर्षण वाढत आहे…’असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच पुढे बोलताना त्यांनी,”देशात माओवाद आणि नक्षलवादाची व्याप्ती कमी होत चालली आहे. आपल्या देशाचे संविधान बंदुकीसमोर जिंकत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. जे झोन पूर्वी देशासाठी रेड झोन होते, ते आता देशासाठी ग्रीन झोन बनत आहेत आणि या अधिवेशनात, संपूर्ण देश देशाच्या अभिमानाचे हे गाणे ऐकेल आणि प्रत्येक खासदाराकडून ते ऐकायला मिळेल” असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले. ‘देश तिसऱ्या अर्थव्यवस्थेच्या दारात’ PM Modi। भारताच्या अर्थव्यवस्थेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, “पूर्वी आपण जगातील १० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतो, परंतु आता आपण त्याला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहोतभारत आपल्या सामर्थ्याने जागतिक व्यासपीठावर ठोठावत आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासोबतच पंतप्रधान म्हणाले, ‘तुम्ही सर्वांनी २०१४ मध्ये आर्थिक क्षेत्रात आम्हाला जबाबदारी दिली तेव्हा देश ‘फ्रॅगाईल फाइव्ह’च्या टप्प्यातून जात होता. २०१४ पूर्वी, आपण जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या स्थानावर होतो. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे…’