Nevasa : दिंडी महामार्ग व धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या महामार्गावर वृक्षारोपण करून संगोपन करा: अभिजीत पोटे

नेवासा: शिवसेना वर्धापन दिनाचे (दि.१९) औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसैनिकांनी सहभाग घेत शिवसेना युवा नेते अभिजीत पोटे यांच्या विशेष प्रयत्नातून अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुख अधिकारी पोलीस, वनविभाग, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम, नॅशनल हायवे, जिल्हा परिषद, एसटी परिवहन महामंडळ, शिक्षण विभागांचे सर्व अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
शिवसेना युवानेते अभिजीत पोटे यांनी जिल्ह्यात अभिनव उपक्रमांची संकल्पना मांडत अहिल्यानगर जिल्ह्यात लाखो भाविक तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी पायी जात असतात पुर्वी या तिर्थस्थळांना जोडणाऱ्या महामार्गावर खूप झाडी होती. हा रस्ता रुंदीकरण व अतिक्रमणामध्ये मोठी वृक्षतोड झाल्याने भाविकांना वाटसरूंना कुठेही रस्त्यावर सावली मिळत नाही.
वनविभागाच्या व ग्रामविकास विभागाच्या मदतीने लोकसहभागातून आणि विशेष निधीची तरतूद करून वारकरी दिंडी महामार्ग अहिल्यानगर ते पंढरपूरकडे जाणाऱ्या सोलापूर हद्दीपर्यंत व श्री साईबाबा शिर्डी ते श्री संत ज्ञानेश्वर मंदिर नेवासा, श्री क्षेत्र देवगड, ते श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, आणि श्री नाथमहाराज मंदिर पैठण, ते श्री भगवानगड,मोहटा देवी, श्री कानिफनाथ मंदिर मढी धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या महामार्गावर दुतर्फा भविष्याचा विचार करावा.
जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनव उपक्रमाचे स्वागत
तसेच योग्य अंतरावर वृक्षारोपण करून ग्रामविकास विभागाच्या मदतीने ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी देऊन ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. लावल्या जाणाऱ्या फळ झाडांचा उपयोग भाविकांना पायी जाताना छायेसाठी होईलच, परंतु वन्यजीव प्राणी पक्षी यांना देखील अन्न मिळेल, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, यावर जिल्हाधिकारी यांनी अभिनव उपक्रमाचे स्वागत केले.
फ्लायओव्हर ब्रिज तात्काळ उभारण्याची मागणी
वनविभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अधिकारी यांना नियोजन करून आढावा सादर करण्यास सांगितले. तसेच महाराष्ट्र शासनाचा वृक्ष लागवडीचा संकल्प अहिल्यानगर जिल्ह्यातून वृक्ष लागवडीतून राज्यात एक मॉडेल तयार करणार असल्याचे सांगितले. तसेच पोटे यांनी नेवासा फाटा येथे दररोज तासन् तास होणारी गर्दी टाळण्यासाठी छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर महामार्गावर चौपद्री फ्लायओव्हर ब्रिज तात्काळ उभारण्याची मागणी केली.
नागपूर सोलापूर पुणे मुंबई कोल्हापूर या ठिकाणी जाणाऱ्या विना वाहक एसटी बसेस नेवासा फाटा येथे थांबत नसल्यामुळे नेवासा तालुक्यातील प्रवासी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच प्रवासी निवारास्थानक नसल्याने प्रवाशांना तासंतास ऊन पावसात जागा उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते.
याच ठिकाणी मोठे एसटी बस स्टॅन्ड करण्यात यावे सर्व पल्ल्याच्या शिवनेरी अश्वमेध सारख्या सर्व प्रकारच्या बसेस या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था करण्यात यावी, अद्ययावत उपाहारगृह स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात यावी, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगरकडे जा जाणाऱ्या एसटी बसेस अनधिकृतपणे परस्पर हॉटेलवर थांबणार नाहीत, प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जाणार नाही, अशी मागणी पोटे यांनी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.
नेवासा फाटा येथे बसस्थानक उभारण्यासाठी योग्य जागा ठरवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले श्री संत ज्ञानेश्वर मंदिर नेवासा, मोहनीराज मंदिर आणि श्री क्षेत्र देवगड येथे यात्रा काळात आणि सनवार सुट्टी काळात व लग्नसराईत होणाऱ्या लग्न सोहळ्यांमुळे महामार्गावर तासंतास होणारी गर्दी टाळण्यासाठी नेवासा फाटा, देवगड फाटा येथे पादचारी लोखंडी पुलाची मागणी पोटे यांनी केली.
राज्य महामार्ग व ग्रामीण महामार्गावरील अनधिकृत स्पीड ब्रेकरमुळे अपघात होत आहेत. पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार स्पीड ब्रेकरने अपघातात आणि त्यांचे प्राण जाऊन पाठीमागून वाहनांना दुसऱ्या वाहनाची धडक बसण्याचे प्रकार जास्त घडत आहेत. खास करून नेवासा – श्रीरामपूर – बाभळेश्वर फाटा लोणी – संगमनेर ते अकोले हटवून त्याच ठिकाणी रमलर बसवून सूचना फलक लावण्यात यावेत, अशी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत स्पीड ब्रेकर हटवून तात्काळ रमलंर निर्मिती करण्याच्या सूचना उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना केल्या. अशा अनेक मागण्या अभिजीत पोटे यांनी केल्या आहेत.
या बैठकीला उपस्थितीत शिवसैनिक महादेव आव्हाड, संजय वाघ, दौलत पठाण, कृष्णा बंडू सातपुते, नानासाहेब तागड, दीपकभाऊ पटारे, नानासाहेब पवार, रमेश भालके, भैरवनाथ कांगुणे, सोमनाथराव गर्जे, बाळासाहेब कराळे, शरद वाळुंज, युसुफभाई पठाण, देविदास मनाळ या सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या समस्या सोडवत यशस्वी बैठक संपन्न झाली.





