पिंपरी : पुण्यातील पुरंधरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. या विमानतळामुळे पुण्याच्या विकासाची गती चौपटीने वाढणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोहगाव, पुणे येथील विमानतळ हे वायू सेनेचे मुख्य केंद्र आहे. या विमानतळावरील प्रवासी विमानांचा ताण कमी करावा लागणार आहे. कारण त्या विमानतळावरून वायू सेनेला आपल्या जवनांना प्रशिक्षण द्यावे लागते. त्यामुळे लोहगाव विमानतळावरून २४ तास प्रवासी विमाने उड्डाणे करणे शक्य होत नाही. विमान उड्डाण आणि उतरण्यासाठी दोन धावपट्ट्या आवश्यक आहे. त्यामुळे पुरंदर पुरंदर विमान तळाची पुणे शहराकरिता आवश्यकता आहे. पुरंदर विमानतळामुळे बाधित शेतकर्यांना जमीन संपादनाचा चांगला परतावा दिला जाईल. तसेच या विमानतळामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. व्यापारामध्ये वाढ होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्गाला विरोध करणारे पळून गेले समृद्धी महामार्ग जमीन संपादनाच्यावेळी काहीजण माझ्याकडे आले. त्यांनी आपण जमीन संपादनाला विरोध करू, असे सांगितले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भू संपादन करताना शेतकर्यांना बाजारभावापेक्षा पाचपट दर दिला. त्यामुळे भू संपादनाला विरोध करणारे पळून भू संपादन प्रक्रियेत सहभागी झाले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.