मुंबई – आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाल्यावर मुंबई इंडियन्सच्या कॅमेरुन ग्रीनच्या संयमी खेळीचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले. तसेच संथपणे खेळ केला अशी टीका करत असलेल्यांनाही टोला लगावला.
संघ पाहूनच कामगिरी केली पाहीजे केवळ अहंकार ठेवून लाभ होत नाही, त्यामुळे संघातील प्रत्येकाने संघासाठी काय योगदान देऊ शकतो याचाच विचार करावा व टीकेकडू दुर्लक्ष करावे, असा सल्लाही सचिनने संपूर्ण मुंबई इंडियन्स संघाला दिला आहे.
ग्रीनने संयम दाखवला नसता तर संघ 192 धावांपर्यंत पोहोचु शकला नसता. त्याने परिस्थिती पाहून आपली अहंकारी वाटेल अशी फलंदाजी केली नाही तर जबाबदारीने खेळ केला. त्याला अन्य खेळाडूंनी योग्य साथ दिली. ग्रीनच्या खेळीतून शिकण्यास नवोदितांना खूप वाव आहे.
ग्रीनवर तो अहंकारी असल्याची टीका सातत्याने होते पण मला वाटते की त्याने जबाबदारी घेण्याची क्षमताही सिद्ध केली आहे. अहंकार चुका करायला भाग पाडतो, त्यामुळे त्या वाटेला जाण्यापेक्षा आपल्या कामगिरीकडे जास्त लक्ष दिले गेले पाहीजे, असेही सचिनने सांगितले.
अर्जुनच्या यशाचा आनंदच
आयपीएल स्पर्धेत यंदाच्या मोसमात अर्जुनने पदार्पण केले. त्यानंतर केवळ दुसराच सामना खेळत असताना त्याने आयपीएल कारकीर्दीतील पहिला बळीही मिळवला. त्याचे यश पाहुन एक वडील म्हणून आनंदच झाला. भविष्यात त्याने असेच यश मिळवावे, असेही सचिनने यावेळी नमुद केले.