PCMC Water Crisis – शहरातील नागरिकांना कमी दाबाने आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. ज्याठिकाणाहून पाणी उचलतो, ती पवना नदी मृत अवस्थेत आहे. पाण्याची चाचणी केली असता ते रासायनिक पाणी असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रक्रिया करून ते पाणी किती शुद्ध होणार? त्यामुळे महापालिका नागरिकांना पाणी नाही तर विष पाजत असल्याचा आरोप नगरसेवकांनी मंगळवारी (दि. ५) महासभेत केला. उन्हाळा सुरू असून शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यावर बोलत असताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक विश्वजीत बारणे म्हणाले, पवना नदीची पाहणी केली. सगळ्या ठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत आहे. हा विषय गंभीर असल्याने आम्ही रावेत बंधाऱ्याचे पाणी चाचणीसाठी घेण्याचा निर्णय घेतला. शहर व पुण्यात जेवढ्या प्रयोगशाळा आहेत, तिथे चाचणी करण्यासाठी देणार होतो. मात्र, त्यांनी पाण्याचे नमुने घेतले नाही. कारण काय? तर पिंपरी चिंचवड महापालिका आमच्यावर कारवाई करेल. जेव्हा खासदारांचे पत्र दिले कारवाई होणार नाही तेव्हा एका प्रयोगशाळेने चाचणी केली. हे पाणी विषारी असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. आपण जे पाणी नागरिकांना पाजतो ते विष आहे. हे पाणी संपूर्ण रासायनिक असल्याचे सिद्ध झाले आहे. नदी पूर्णपणे मृत अवस्थेत आहे. नदीमध्ये माशांचा थर दिसत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका. एसटीपी प्लँट सगळ्या सोसायट्यांचे सुरू पाहिजे. नदीच्या जवळ गेल्यानंतर वास येतो. गटारीचे पाणी आपण शहरातील नागरिकांना पाजत आहोत. नगरसेविका संगिता ताम्हाणे म्हणाल्या, शहरात पाण्याची टंचाई आहे. पाण्याची लेव्हल कमी असल्याचे अधिकारी सांगतात. सेक्टर २३ मधून जे पाणी येत, त्यामधील दोनच पंप चालू आहे. एक पंप बंद आहे. पाण्यात अळ्या असल्याचे वारंवार अधिकाऱ्यांना सांगितले आहे. श्रुती वाकडकर म्हणाल्या, पाणीटंचाई जाणवत आहे. कमी दाबाने पाणी, अनियमित पाणी आणि अशुद्ध पाणी येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक टँकरने पाणी खऱेदी करत आहेत. कर भरूनही त्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. सुलभा उबाळे म्हणाल्या, आपण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहोत. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे पाप केले आहे. पाण्यासाठी खर्च करा. नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेवक कुशाग्र कदम, निखिल बोऱ्हाडे, संदीप वाघेरे यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही जोपर्यंत पवना बंद जलवाहिनीचे काम होणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नसल्याचा सूर यावेळी नगरसेवकांनी आळवला. त्यासाठी शहरातील पाच आमदार, एक खासदार आणि १२८ नगरसेवकांनी प्रयत्न करावे. जर पुणे महापालिका भामा आसखेडचे पाणी आपल्यानंतर काम सुरू करून पुण्यात नेत असतील तर आपल्याला का जमत नाही असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. नदी प्रदूषण या शहराला भेडसावणारा सर्वात गंभीर प्रश्न पाणीच आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वीच याची कल्पना आली होती. पहिल्या दिवसापासून मी या प्रश्नांवर काम करत आहे. आजच १२० एमएलडी पाणी कमी आहे. शहराला ७७० ची गरज आहे ५५० एमएलडी पाणी येत आहे. पाणी प्रचंड खराब आहे. पण पर्याय नाही म्हणून आपण पाणी तेथून घेत आहोत. आपल्याला जे पाणी येतय ते वरच्या गावांकडून येते. जवळपास २८ गावे आहेत एकाही ठिकाणी पाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. आता पीएमारडीएच्या बैठकीत एसटीपीची चर्चा झाली आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाणी खराब येणार. पुढच्या आठवड्यात भामा आसखेडच्या कामाचा आदेश देता येईल. सहा महिन्याच्या आत ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आंद्रा जॅकवेलच्या जमिनीला मंजुरी मिळाली आहे. पवना बंद जलवाहिनी शाश्वत असणार आहे. पाच मल्टिएजन्सी आहेत, ज्या आपल्याला कर्जपुरवठा देऊ शकतात. गेल्या महिन्यात त्यांच्याशी बैठका झाल्या आहेत. पवना बंद जलवाहिनीसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही. चासकमानसाठी धोरणात्मक निर्णयासाठी शासनाला प्रस्ताव दिला आहे. पाण्याचे सर्व पॅरामीटर तपासून पाणी देत आहोत. – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त.