पुणे – लॉकडाऊन काळात मोबाइल रिचार्ज करण्यासाठी नागरिकांना बाहेर पडावे लागू नये, यासाठी बहुतांश टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज व्हॅलिडिटी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता 5 मेपर्यंत मुदतवाढ मिळाली असून कोणत्याही ग्राहकाची इन्कमिंग आणि आऊटगोईंग सेवा बंद होणार नाही. केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केलेल्या सूचनांनुसार हा निर्णय घेतला आहे.
याबाबत बीएसएनएलचे पुणे विभागाचे प्रिन्सिपल जनरल मॅनेजर संदीप सावरकर म्हणाले, “करोनाच्या संकटग्रस्त परिस्थितीत बीएसएनएल ग्राहकांच्या पाठीशी आहे. बीएसएनएलने रिचार्ज हेल्पलाईनही सुरू केली आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांकही दिला आहे.’