नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार असल्याचे दिसत आहे. तसे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारखे सोशल मीडियावरचे अकाऊटंस बंद करण्याचा विचार करतोय, असे मोदी यांनी ट्वीट केले आहे. मोदींच्या या ट्वीटनंतर अनेक दिग्गजांसह सामान्य माणसांनीही यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी मोदींना सोशल मीडिया सोडू नका, अशी विनंतीही केली आहे. तर विरोधकांनी आता पंतप्रधानांवर खोचक टीका करण्यास सुरूवात केली आहे.
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासमवेत अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी मोदींवर टिका करण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे.
Give up hatred, not social media accounts. pic.twitter.com/HDymHw2VrB
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 2, 2020
पंतप्रधान मोदीजी द्वेष सोडा, सोशल मीडिया नको, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी यांना दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या मनात द्वेष आहे, अशी टीका अनेक वेळा राहुल गांधी यांनी केली आहे.
Respected Modi ji,
Earnestly wish you would give this advise to the concerted army of trolls, who abuse-intimidate-badger-threaten others every second in you name!
Sincere Regards,
Citizens of India. https://t.co/hGtf64Fyf9— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 2, 2020
कॉंग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ‘सन्माननिय पंप्रधानजी, तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही त्या ट्रोलर्सच्या फौजेला हा सल्ला द्या की, जे तुमच्या नावाने दर सेकंदाला अपशब्दांचा वापर करत धमक्या देतात.’
सामाजिक संवाद के रास्ते बंद करने की सोचना अच्छी नहीं है बात… छोड़ने के लिए और भी बहुत कुछ सार्थक है साहब… जैसे सत्ता का मोह-लगाव, विद्वेष की राजनीति का ख़्याल, मन-मर्ज़ी की बात, चुनिंदा मीडिया से करवाना मनचाहे सवाल और विश्व विहार… कृपया इन विचारणीय बिंदुओं पर भी करें विचार!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 2, 2020
अखिलेश यादव यांनी ट्वीट केले आहे की, ‘सामाजिक संवादाचे रस्ते बंद करण्याचा विचार करणे योग्य गोष्ट नाही. सोडण्यासाठी अनेक गोष्टी आहेत साहेब. जसा सत्तेचा मोह, विद्वेषाच्या राजनितीचा विचार, मन-मर्जी करण्याच्या गोष्टी, निवडक मीडियाशी विचारलेले तुमच्या आवडीचे प्रश्न आणि विश्व विहार. कृपया या गोष्टिंवर विचार करा.’
सामाजिक संवाद के रास्ते बंद करने की सोचना अच्छी नहीं है बात… छोड़ने के लिए और भी बहुत कुछ सार्थक है साहब… जैसे सत्ता का मोह-लगाव, विद्वेष की राजनीति का ख़्याल, मन-मर्ज़ी की बात, चुनिंदा मीडिया से करवाना मनचाहे सवाल और विश्व विहार… कृपया इन विचारणीय बिंदुओं पर भी करें विचार!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 2, 2020
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही ट्वीट केलं आहे की, ‘विचार करतोय की, सोमवारी काय कराव?’
जीडीपी लगी गिरने तो टीआरपी स्टंट लगे बढ़ने!!#DhyaanBhatkaoYojna
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) March 2, 2020
जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय लीडर कन्हैया कुमार यांनीही ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, ‘जीडीपी लगी गिरने तो टीआरपी स्टंट लगे बढ़ने!!