नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी करतील सूचक वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. सर्व विरोधी पक्षांना नरेंद्र मोदी यांना हरवायचे असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी दले एकत्र येतील असे विधान राहुल गांधी यांनी केले.
देशातील सर्व विरोधी पक्षांचे ध्येय हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना पराभूत करायचे आहे. त्यामुळे संपूर्ण देशात भारतीय पक्षाला रोखण्यासाठी एकत्र यावेच लागेल. असे राहुल गांधी म्हणाले. आपल्याला संविधान आणि सामाजिक वारशाला वाचवायचे आहे. त्यासोबतच अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा परत बसवायची आहे, रोजगार वाढवायचे आहेत, अन्याय आणि असमानता दूर करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे.