पुणे – ज्या दिवशी भारतात सोनं सोडून पुस्तकं चोरीला जातील, तो दिवस भारतातील सुवर्ण दिवस असेल, असं मत ओपन बुक लायब्ररीच्या टीममधील अभिषेक अवचार याने व्यक्त केलं. पुण्यातील तरुणांनी ओपन बुक लायब्ररी चळवल सुरु केली.
ही कल्पना यवतमाळच्या प्रियंका चौधरी या तरुणीची आहे. ही लायब्ररी फक्त पुण्यातच नाही तर ग्रामीण भागातही सुरु करण्यात आली आहे. त्यात परभणी, जुन्नर या गावाचा समावेश आहे.
शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर ओपन बुक लायब्ररी सुरु केली आहे. त्यात अनेक प्रकारची पुस्तके, विविध भाषेची आणि विविध विषयांवर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहे.