पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात 30 नोव्हेंबरपर्यंत केवळ महत्त्वाच्या दाव्याची सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. सुरूवातीला जिल्हा न्यायाधीशांमार्फत विचारणा करून, त्यानंतर बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आण्इ गोवाच्या पदाधिआऱ्यांशी चर्चा करून या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.
शिवाजीनगर येथील न्यायालयाचे कामकाज सध्या 11 ते 2 या वेळेत सुरू आहे. रिमांड, जामीन, खटल्यातून वगळण्याचा अर्ज आणि निकालावर असलेल्या दाव्यांवर सुनावणी होत आहे. हीच परिस्थिती 30 नोव्हेंबरपर्यंत राहणार असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतिश मुळीक यांनी सांगितले.