मुंबई – जेव्हा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व करत होते तेव्हाही, आणि आता जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेतृत्व करत आहे. तेव्हाही त्यांच्या मागण्यांचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीने केला. आत्ताही करणारच आहे. शिंदेंना 22 जागा देण्यास किंवा लोकसभा, विधानसभेच्या जागावाटपावर भाजपचे कुणी नकार दिला नाहीये, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भाजपने लोकसभेच्या शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 22 जागा नाकारल्या हे मत कोणत्या नेत्यांनी व्यक्त केले नाही. कोणताही प्रश्न टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सोडवला जाणार नाही. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चा करुन सोडवतील. आम्हाला खूर्ची, जागा किंवा सत्ता नाही तर जनतेचे हित महत्त्वाचे आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या वाटपावर भाजपने काहीच प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिली नाही. आम्ही एकत्रित येऊन सर्व विचार करतो आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. जूनमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, अशी आमच्यासारख्या नेत्यांची ईच्छा आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बसून यावर चर्चा करतील. तर किर्तीकरांची नाराजी घालविण्यासाठी प्रयत्न ज्येष्ठ नेते करतील, अशी प्रतिक्रीया मंत्रीमंडळ विस्तारावर बोलताना मुनगंटीवारांनी व्यक्त केली
त्यांच्याकडून केवळ टीका
मुनगंटीवार बोलताना पुढे म्हणाले की, ठाकरे गटाच्या मुखपत्राच्या अग्रलेखात कधी कौतुक केले असे दाखवता येईल का? टीका करणे हेच त्यांचे कामच आहे. जे दृष्ट विचार सरणीचे असतात त्यांनी तसे काम करावे आणि जे चांगल्या विचारसरणीचे असतात त्यांनी चांगले काम करायचे असते. त्यांच्याकडून अजित पवारांवरही टीका केली जाते. त्यांना स्वत:चा परिवार सोडून जग आहे हेच माहिती नाही.