मुंबई – करोनाच्या आधारावर मात करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या दारात, बाल्कनीत येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं आहे. या उपक्रमाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे.
रोहित पवार म्हणाले कि, दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. तसेच अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. याची सुरुवात रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर तिरंगा ठेऊन केली आहे.
दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान @narendramodi जी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 3, 2020
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी भाषणावेळी कोणीही एकत्र व्हायचं नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषा तोडायची नाही. करोनाची साखळी तोडण्याचा हा रामबाण उपाय आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.