नगर -महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यात गेल्या अडीच महिन्यांपासून सलून व्यावसायिक घरात आहे. त्यामुळे समाजात उपासमारी सुरु झाली आहे. परिणामी उपाशी मरण्यापेक्षा आमरण उपोषण करुन सरकारला जाब विचारु, अशी भूमिका स्पष्ट करत आजपासून महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत उपोषण आरंभले.
राज्य सरकारने अन्य राज्यांतील स्थिती पहावी. तेथील काही नियमांच्या आधारे महाराष्ट्रातील नाभिक व्यावसायिकांना संधी द्यावी, अशी आमची मागणी आहे. मात्र, त्याकडेही सरकार दुर्लक्ष करणार असेल, तर पुढील काळात आत्मदहन करण्याचाही इशारा आंदोलनात सहभागी झालेल्या नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाच्या तपोवन रस्त्यावरील श्री संत सेवा भवनात आज सकाळी दहा वाजता महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील वाघमारे, सरचिटणीस विकास मदने व योगेश शिंदे यांनी महामंडळाच्या वतीने आमरण उपोषण आरंभले आहे.
लॉकडाऊन पाचचा टप्पा सुरु झाल्यानंतरही नाभिक समाजाच्या अडचणी अद्याप दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदच उपोषण सुरु करण्याचा ठराव काल करण्यात आला होता. त्यानुसार श्री संत सेना भवन येथून आंदोलनास प्रारंभ होईल, अशी माहिती महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष राऊत यांनी दिली होती.
नाभिक समाजाच्या प्रमुख मागण्या…
क्कर्नाटक सरकराच्या धर्तीवर 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे.
क्प्रत्येक सलून व्यावसायिकाचा आरोग्य विमा सरकारतर्फे करण्यात यावा.
क्राज्यातील सलून व्यावसायिकांच्या दुकानांचे भाडे, लाईटबील माफ करण्यात यावे.