“भारत’साठी आगोदर प्रियांकाची निवड झाली होती. पण तिने हॉलिवूडच्या प्रोजेक्टसाठी “भारत’सोडला आणि तिच्या जागेवर कतरिनाची वर्णी लागली. हा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. पण प्रियांकाने आपला सिनेमा सोडला हे सलमानच्या डोक्यातून काही केल्या जायला तयार नाही. यापूर्वीही त्याने प्रियांकाच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. पुन्हा त्याने तोच विषय काढल्यावर मात्र कतरिना भडकली आणि “पुन्हा प्रियांकाचा विषय काढू नकोस.’ अशा शब्दात तिने सलमानला बजावले आहे.
सलमान विनाकारण प्रियांकावर टीका करतो आहे, असे म्हणत सलमानला बरेच ट्रोलही केले गेले होते. सलमानच्या या कॉमेंट्समुळे कतरिना अजिबात खुष नाही. प्रियांकाने सिनेमा सोडला, त्याला आता बरेच दिवस झाले आहेत. आता तर “भारत’चे शुटिंगही संपत आले आहे. सलमानने आता हा मुद्दा विसरायला पाहिजे आणि पुढचा विचार केला पाहिजे. तिने आपले मत सलमानला स्पष्ट शब्दात सांगितलेही आहे.
सलमानने जरी तिला आश्वासन दिले असले, तरी तो सुधारण्याची शक्यता फार कमी आहे. विशेषतः “भारत’जेंव्हा रिलीज होईल, तेंव्हा हा विषय पुन्हा नक्की उपस्थित केला जाईलच.