प्योंगयांग – उत्तर कोरियात परदेशी कार्यक्रम पाहिल्यास अटक केली जाते. त्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक देत छळ केला जातो. तुरूंगात मृत्यू पावलेल्या कैद्यांना तेथेच जाळले जाते. मृतदेहाची राख असलेले पाणी बळजबरी पाजले जाते, अशी माहिती उत्तर कोरियातील तुरूंगातून पळून आलेल्या एका कैद्याने दिली आहे.
उत्तर कोरियातील मानवाधिकारांसाठी कार्यरत असलेल्या वाॅशिंग्टन मधील HRNKने एका कैद्याची मुलाखत घेतली होती. मुलाखतीत तेथील कैद्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
कैद्याने सांगितले की, परदेशी वाहिनी पाहिल्यास, ख्रिश्चन धर्माचे पालन केल्यास लोकांना अटक करून तुरूंगात ठेवले जाते. एकाग्रता शिबिर असे त्या तुरूंगाला नाव देण्यात आले आहे. तेथे कैद्यांचा प्रचंड छळ केला जातो. त्या तुरूंगात आठवड्याला एका तरी कैद्याचा मृत्यू होतो.
दर सोमवारी मृत कैद्यांना जाळले जाते. त्यांच्या मृतदेहाच्या राखेचा वापर हा खत म्हणून केला जातो. छावणीजवळ एक तलाव असून पावसात ती राख त्या तलावात मिसळते. त्याच तलावातील पाणी कैद्यांना पिण्यासाठी आणि
अंघोळीसाठी दिले जाते असे कैद्याने मुलाखतीत सांगितले.